🚩 श्राद्ध करावं श्रद्धा ठेवून ✍️
!!श्राद्ध करावं श्रद्धा ठेवून!! देवपूजा देवांचा महिना श्रावण महिना असं म्हणतात. श्रावण संपला श्रावण संपण्या अगोदर शेवटी पशु म्हणजे बैल पूजा करतात. पोळा सण नंन्तर. आराध्य दैवत गणपती स्थापने नंन्तर गणेश विसर्जन करून मग पितुपक्ष सुरवात होते. म्हणजेच देवा नंन्तर पशु मग पूर्वजांची आठवण म्हणून पितृपक्षात पंदरवाड्यात आपले पूर्वज यांची आठवण करून श्राद्ध केलंच पाहिजे असं माझं मत आहे. धर्म,जात, पंथ कुठला पण असो. प्रत्येक माणसाने केलंच पाहिजे. पूर्वी आपले पूर्वज यांची आठवण काढलीच पाहिजे. का तर? माझी अल्प बुद्धिमत्ता आणि सर्व अध्यात्मिक महापुरुष यांनी सांगितलेलं आहे त्या प्रमाणे.प्रथम मी माझ्या जीवनातील एक सत्य घडलेला किस्सा सांगतो. माझे वडील मी कॉलेज शिक्षण करतं असतांनाचं वारले होते. तद नंन्तर लहान भावंड आणि कुटुंब यांची जबाबदारी माझ्यावर आली होती. वडील वारल्या नंन्तर चार -पाच वर्ष साधारण झाले असतील. एकदा लहान भाऊ फिरायला मित्रांच्या सोबत गेला होता. असंच पहाटे मी झोपलेलो मला बरोबर पहाटे साधारण सहा वाजता अचानक माझ्या वडिलांनी हात लावुन उठवलं. "अरे प्रदीप ऊठ अनिल चं काय झालं बघ. मि आहे क...