कथा क्र 02
| | बोध कथा - क्रमांक: 02 | | लेखक -प्रदीप मनोहर पाटील. माझे आजोबा कै. वेडू आण्णासो.. लहानपणी मला नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील एक गोष्ट... गाव होते लहान काळ नवं युगास सुरवातीचा. सारे बाराबलुतेदार गुण्यागोविंदात आप आपली कामं करत. हेवेदावे, द्धेष, मत्सर कधीच कोणाला शिवत नसे एकोपा सर्वांच्या ठायी भरलेला. विभिन्न कामं करून कुठंही जातीभेद लवलेश न्हवता.गावात एकमेकांना मान सन्मान योग्य ठेवत. एकीत सारे कामे करत. गावात पाटील यांचा दरारा भलामोठा वाडा सुख समृद्धी तेथे नांदत होती छोट्याश्या किल्या प्रमाणेच त्यांचा वाडा होता. वाड्यात नोकरचाकर यांचा राबता असे. पाटलांनी हिशोब लिहण्या साठी मुनीमजी ठेवला होता. त्यातूनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज येई.. पाटलांच कुटुंब तसं लहानच ते दोघे आणि त्यांना एकच मुलगा त्याच नुकतंच काही दिवसा पूर्वी लग्न झाले होते. संध्याकाळची वेळ होती दिवे लागणीची पाटील ओसरी वर बसलेले असतात. नेमकं त्याच वेळी गावात काही शिक्षण प्रेमी गावात शाळा उभारणी करत असतात ती चार पाच जण शाळे...

खूप छान
ReplyDeleteधन्यवाद... जी
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteजय हिंद.खरी क्रांती जर कोणी घडवून आणली असेल तर ती आझाद हिंद सेनेने आणि नेताजी सुभाषचंद्र बाबू यांनी .आणि त्यांनी दिलेलामंत्र सदैव सैनिका पुढेच जायचे न मागती तुवा कधी फिरायचे.हा सगळ्यांनी सदैव लक्षात ठेवला पाहीजे
ReplyDeleteमनापासून धन्यवाद आपला आभारी आहे.
Delete